खानझोडे कुटूंबाचे पळसोनी येथील आषाढीवारी ला जाणाऱ्या भाविक भक्तांचे स्वागत करून..सदिच्छा भेट.
आनंद नक्षणे..
भारताच्या प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक महारष्ट्राच्या अस्मितेचा शिरपेचात मनाचा तुरा समजला जाणारी पंढरपूरची वारी. या ठिकाणी आषाढी पौर्णिमेला लाखो भाविक.. हृदयाचा ठेका चुकू शकतो पण आषाढीवारी खंड पडत नाही… करोड्या संख्येने आपल्या विठ्ठलाला व पांडुरंगाच्या भेटीला प्रतीवर्षे चातका सारखी वाट पाहणारा भोळा भाविक आज हजारो च्या संख्येने वस्ती वाड्यातून खेड्यापाड्यातून मिळेल त्या मार्ग व मिळेल ति व्यवस्थेने आपल्या विठ्ठल दर्शना साठी जातं असतो, आज राजूर सर्कल येथील पळसोनी, मुरधोनी येथील वारकरी ,भाविक भक्त आषाढी वारी निमित्य वणी डेपोतून रवाना होणार होते, त्यानिमित्ताने प्रवीण खानझोडे यांनी सहपत्नी जावून सर्व भाविक भक्ताचे स्वागत करून व महिलांना हळदीकुंकू लावून सन्मानित करून त् आषाडी वारी साठी शुभेच्छा दिल्या, त्यावेळी सर्व भाविक भक्त उपस्थित होते….