शहरातील नागरिकांच्या आरोग्यासी पालिकेचा खेळखंडोबा, दूषित पिण्याचा पाणी पुरवठा., नागरिकांत प्रचंड आक्रोश.
शहरात पाण्यामुळे नागरिकांना गंभीर आजार, अधिकारी मस्त : युवसेनेचा गंभीर आरोप.
राजू तूरणकर — वणी.
मागील अनेक दिवसांपासून वणी शहरात नियमित दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक प्रभागातील नागरिकांनी याबाबत नगर परिषद येथे तोंडी तसेच लेखी तक्रार दिली आहे. आणि अजूनही अनेक प्रभागात दूषित पाणीपुरवठा होत असून प्रश्नसून याबाबत आंदोलन करण्याचा विचार केल्या जात आहे. दूषित पाणीपुरवठा होणाऱ्या भागामध्ये आशीर्वाद बार जवळचा परिसर, विठ्ठलवाडी, पट्टाचारा नगर, प्रगती नगर, गुरूनगर, कनकवाडी, शास्त्रीनगर, सेवानगर, माळीपूरा हे प्रमुख आहे. यातील अनेक भागात नाल्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याचे कारण कारण समोर करून जनतेच्या आरोग्याशी खेळ नगरपालिका प्रशासन करीत आहे.
यावर्षी पासून नगर परिषदेने पाणी करात वार्षिक 600 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ केल्यानंतरही नगर परिषदेकडून दूषित पाणी वणीकरांना पुरविल्या जात आहे. तरी या दूषित पाण्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोर जावे लागत सध्या संपूर्ण जिल्यात डेंगून थैमान घातले आहे. तापाची साथ सुरू आहे रुग्णालय रुग्णांनी भरले आहे. अशातच नगर परिषद फॉगिंग कडे दुर्लक्ष सुरू आहे. अनेक परिसरात फॉगिंग केलेले नाही. जिल्हयातून साथ तालुक्यात येण्यास वेळ लागणार नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानंतर नगर परिषदेला जाग येणार आहे काय? नगर परिषदेला जर जाग येत नसल्यास युवासेना आपल्या दमदार आंदोलनाने जाग आणण्यास तयार आहे. व होणाऱ्या पारिणामास नगर परिषद जबाबदार राहील अशा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिला आहे.
यावेळी चित्रा अंकुश पिदूरकार , शितल अशोक कुबडे, चंदा जयदेव धोटे, संगीता नरेंद्र ताजने, शोभा नीळकंठ देठे, शोभा मयुरी अशोक उलमाले , सबिया शेख, निळकंठ देठे, मंगल भोंगळे, राहुल सुरेश कोलते, रोहित म. कुमरे, अनिकेत न. पिदुरकर, चेतन उलमोले , राजू पारधी, आशिष बदखल, सत्यम मंचावार उपस्थित होते.