त्या ठिकाणी घडलेल्या घटनेत, रेती तस्करासमोर प्रशासन हतबल
रेती तस्कर व महसूल प्रशासनात रात्री घडला थरार…
धारदार शस्त्रे पाहून महसूल प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी केला पोबारा…
राजू तुरानकर–संपादक लोकवाणी जागर.
काल रात्री दहा वाजे दरम्यान करणाडी फाट्यावरती अवैध रेती तस्करी करणारा हायवा (ट्रक) पकडल्यामुळे रेती तस्कर व महसूल प्रशासनामध्ये थरार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मारेगाव तालुक्यात वर्धा नदी पात्रातून दररोज रेती तस्करी सुरू आहे. या अनुषंगाने महसूल प्रशासनाचा कायम कारवाईचा बडगा सुरू असताना, काल रात्री करणवाडी फाट्यावर महसूल प्रशासनाचे एक पथक गस्त घालत असताना , रेती भरलेला हायवा करणवाडी फाट्यावर पकडला आणि एखाद्या चित्रपटाला शोभेल असे उपस्थितांच्या समोर घडल्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरू आहे.
त्या ठिकाणी घडलेल्या रेती तस्करासमोर प्रशासन हतबल झाल्याची शहरात खमंग चर्चा सुरू आहे.. विशेष म्हणजे या घटनेत दोन राजकीय पुढारी घटनास्थळी उपस्थित असल्याने या कलगीतुऱ्याला संदेह निर्माण झाला हे विशेष…
नेमक काय घडलं…यावर विविधांगी चर्चा होत असताना घटनेदरम्यान धारदार शस्त्र निघाल्याचे ऐकिवात आहे. करणवाडी फाट्यावर रेती भरलेला हायवा आला, त्याच मागावर महसूल प्रशासनाचे वाहन दाखल होताच, ट्रक थांबविण्यात आला. कारवाईला सुरुवात झाली, तेव्हड्यात एक पांढऱ्या रंगाच्या गाडीतून चार पाच गुंड प्रवृत्तीचे लोक हातात धारधार शस्त्र घेवून अंगावर आल्याने फाट्यावर आपला जीव मुठीत धरून कर्मचारी पळून आल्याची चर्चा तालुक्यात जोर धरून सुरू आहे..
मात्र रेती उपसा सुरू, रेती चोरी सुरू, घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नाही. एव्हढी मोठी घटना होऊन कुठेही पोलिसात तक्रार नाही. मग हा सर्व देखावा तर नाही ना…. जनमानसात चर्चा व्हावी यासाठी तर नाहीना… . या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून, रेती तस्कर व महसूल प्रशासनाचे पटवारी, मंडल अधिकारी , तहसीलदार यांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासणी व्हावी अशी चर्चा जनमानसात जोर करत आहे.