उकणी येथील माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा…
बावीस वर्षानंतर झालेल्या भेटीने, विद्यार्थी रमले आठवणीच्या शाळेत.
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
उकणी:- आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गमित्र, मैत्रिणी भेटणे दुर्मिळ झाले असून, प्रत्येक जण आपापल्या संसारात रमले असून जीवनाच्या प्रवाहात कुणी कुठे आहेत याचा पत्ता नाही.
मात्र २२ वर्षानंतर नवभारत हायस्कूल उकणी शाळेतील २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा वरझडी बंडा परिसरात योग जुळवून घेत उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी मेळव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला, शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक भावनेतून प्रत्येकाला कशी मदत करता येईल हे या मेळाव्याचा विशेष हेतू होता. हे विध्यार्थी आज आपआपल्या निवडलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी उत्कृष्ठ बागायतदार, कुणी व्यावसायिक तर काही नोकरी निमित्त बाहेरगावी स्थायिक झाले आहेत. तरी सुद्धा फक्त एका फोन व मोबाईल संदेश ने 22 वर्षांनंतर एकत्र भेटून जुन्या आठवणीना उजाळा दिला. मनमुराद आनंद घेत आठवणीच्या शाळेत रमले.
यावेळी नागेश मारुती बडवाईक, मोहन सूर्यभान धांडे, नंदकिशोर सुधाकर ढवळे, विठोबा महादेव ढवळे, सोमेश्वर नानाजी धपकस, संजय अरुण जीवतोडे, संजय कृष्णाजी खाडे, मनीष घनश्याम खाडे, राजकुमार गणपत खापणे, डॉ. अनिल शंकर कातरकर, प्रदीप गणपत कातरकर, रवी अरुण लाड, दिनेश नानाजी मांडवकर, पुरुषोत्तम कृष्णाजी पाचभाई, सचीन बबन रामटेके, पुरुषोत्तम मारुती रासेकर, महेश राघोजी रोडे, संजय नामदेव वासनकर, सतीश रमेश ढेंगळे, नरेंद्र नामदेव गोहोकार, सचिन बबनराव झिले, गजानन खाडे, महादेव जुनघरी उपस्थित होते.
ही सर्व जुळवा जुळव घडवून आणण्यासाठी यशस्वी धावपळ सोमेश्वर नानाजी धपकस, राजकुमार गणपत खापणे, दिनेश नानाजी मांडवकर, संजय नामदेव वासनकर, प्रदीप गणपत कातरकर, यांनी केली.
यावेळी उपस्थित सर्व सुत्रसंचालन पुरुषोत्तम मारुती रासेकर, सचिन बबनराव रामटेके, पुरुषोत्तम कृष्णाजी पाचभाई यांनी तर आभार महेश राघोजी रोडे, रवी अरुण लाड, मनीष घनश्याम खाडे, यांनी मानले.