लाईनचा लपंडाव, अधिकारी मेंटेन, मेंटेनन्स कंपन्या मस्तवाल, जनता हैराण.

0
245

वणी शहरात विजेचा लपंडाव, अधिकारी मेन्टेन, मेन्टेनंस कंपन्या मस्तवाल….

राजकीय नेते सुस्त, जनता त्रस्त, अधिकारी मस्त…

मेन्टेन अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नागरिक हैराण…

राजू तुरणकर – संपादक….

काल सकाळ पासून दिवसातून दहा वेळा ट्रिक लाईन गेली. काल, अधिकारी मेंटनांस कंपन्यांसोबत मिलीभगत असते व कंपन्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसून मेंटनंस  बरोबर करत नाही, अधिकाऱ्यांना मेन्टेन करतात, आणि लोकांना मेंटल समजतात, नेत्यांच्या घरी सोलर सिस्टम, जनरिटर असतात, त्यांना लोकांचं काही घेणे देणे नाही. यावर ते बोलत नाही. ते किती जनातेप्रती संवेदनशील आहोत हे लक्षात येते, एकंदरीत लोकांच्या थंडपणामुळे, प्रत्येक वेळी दुर्लक्षित धोरणामुळे नेते आणि अधिकारी मस्तवाल झालेले आहेत. वीजवितरण आणि पाणी पुरवठा या दोन क्षेत्रात हलगर्जीपणा व भ्रष्टाचार नको अशी जनमानसात चर्चा असून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याबद्दल प्रशासनाबद्दल आणि कारभाराबद्दल जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे, आणि या त्रस्त कारभारा विरोधात जनतेचा भावनांचा उद्रेक झाला तर अधिकाऱ्यांना मेन्टेन भारी पडेल अशी गावात जोरदार चर्चा आहे…

दुपारी लोक रखरखत्या उन्हात घराबाहेर पडत नाहीयेत, त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे आवश्यक आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित का होतो, याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीवर संपर्क साधला असता इन्कमिंग लाईन नादुरुस्त झाली आहे, तीचे काम झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल असे बेधडक उत्तर मिळते.

वास्तविक पाहता उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर व घरातील सर्व सदस्य एकत्र घरात असल्यानंतर उष्णतेचे प्रमाण अधिकच वाढते. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे अत्यंत महत्त्वाची कामे प्रशासन दरबारी सुरू आहे, तरी तालुका प्रशासनाने देखील वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करून नागरिकांना जास्तीत जास्त वेळ वीज पुरवठा सुरू राहील असे पाहावे. दिवसादेखील वीज पुरवठा एक ते दीड तास, दोन तास, इतका खंडित होतो. तर रात्रीच्या वेळेला देखील वीस मिनिटे, एक तास एवढा वेळ वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर घरात लहान मुले असतील तर ती देखील झोपत नाहीत. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा जास्तीत जास्त वेळ सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

 एक ब वर्ग दर्जाचा इंजिनियर फोन उचलत नाही, व लोकांना माहिती देत नाही अशी गावात जबरदस्त चर्चा आहे. तो अभियंता आपल्या तोऱ्यात वावरतो व लोकांना हा लोकसेवक असून सेवा देत नाही. त्यामुळे या व्यक्तीबद्दल कर्मचारी वर्ग सुद्धा याचा मेंटेनन्स भारी पडत आहे , असे दबक्या आवाजात बोलत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here