कोळशाची धूळ शेतकऱ्यांच्या जीवावर, धुळीने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची पिके काळवंडली.

0
195

कोळशाच्या धुळीने पिके काळवंडली, कोळसा धूळ प्रदूषण शेतकऱ्यांच्या जीवावर.

साखरा ते शिंदोला रस्त्यालगत वेकोलीच्या कोळसा धुळीमुळे पिकांची उत्पादन क्षमता कमी होऊन झालेल्या नुकसानीचा, प्रदूषण कायद्या नुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : विजय पिदुरकर

राजू तुरणकर —संपादक लोकवाणी जागर.

वेकोली वणी एरिया अंतर्गत मुंगोली, कोलगांव पैनगंगा खाणीतील साखरा ते शिंदोला मार्गे शिरपूर घुग्घुस रेल्वे साईडिंग येथे कोळसा वाहतुक मधुन उडणारे धुळीचे कण व गाडीतून कोळश्याचे ढेले पडून, त्यावर चाललेल्या वाहनाने चुरी झाल्याने, ते हवेव्दारे रस्त्यालगतच्या कोलगांव, साखरा, शिवनी, येनक, येनाडी, शेवाळा, शिंदोला, कुर्ली या आठ गावातील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिके फुल, पाकळया व पानावर धुळ साचून प्रकाश संश्लेषणाची क्रिया बंद पडल्याने पाकळया गळून पडणे, झाड मरणे, कापूस काळा होणे यामुळे उत्पादन खर्च वाढून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. याबाबत रस्ता रोको दरम्यान दिलेले लेखी आश्वासनानुसार आपल्या सुचनेवरुन तालुका कृषि अधिकारी, वणी यांनी अहवाल सादर करुन जवळपास १ महिन्याचा कालावधी लोटून सुध्दा वेकोलीने शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीचे भरपाई अद्यापही दिलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांना वेकोलीच्या बेकायदेशीर रस्ता वाहतुक नियमानुसार व Air (Prevention and Control of Pollution) Act 1981 चे उल्लंघन करुन शेतपिकाचे नुकसान झाले त्याची भरपाई मिळण्याकरीता शेतीचे महत्वाचे काम सोडून रस्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागते याऊपर भरपाई मिळविण्यासाठी सुध्दा शेतकऱ्यांना नाईलाजाने आंदोलन करावे लागत असेल तर कृषिप्रधान देशाच्या दृष्टिने हि बाब अतिशय गंभीर आहे. आपणास विनंती की, वेकोलीने आश्वासन देऊन ४ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. याकरीता कृषि विभागाकडून नुकसानीचा उत्पादन व उत्पन्न अहवाल दिल्यानुसार भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्याचे आधीच नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडले असून वेकोलीने मानवनिर्मीत कोळसा धुळ प्रदुषनाने नुकसान केल्याने शेतकऱ्याचे जगणे मुश्कील झाले आहे. वेकोलीचे बेजाबदार व आडमुठे धोरण शेतकऱ्याच्या जिवावर उठले आहे. शेती पिकाचे नुकसान या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशिघ्र वेकोलीला नुकसानीचा मोबदला देण्यास भाग पाडावे अन्यथा नाईलाजाने अन्यायाच्या विरुध्द न्यायासाठी लोकशाही मार्गाने ७ दिवासचे आत नुकसान भरपाई देण्याचा तोडगा न निघाल्यास न्याय्य मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here