समीर लेनगुळे सारखे युवक महाविकास आघाडी सोबत असणं गरजेचे – माजी मंत्री यशोमती ठाकूर.
राजु तुरणकर _ वणी
अमरावती येथे महाविकास आघाडी युवक मेळावा दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 ला पार पडला, त्यामध्ये युवा सेनेकडून प्रवक्ते म्हणून समीर लेनगुळे यांनी उपस्थित दर्शवली, आणि सभेला मार्गदर्शन केले, या देशांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस आणि महायुतीने शेतकऱ्यांची अवहेलना करून विद्यार्थ्यांना युवकांना, फसवण्याचे महापाप केलेलं आहे, असे प्रतिपादन समीर लेनगुळे यांनी केले, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आदेशांवर चालतो, उद्धव साहेबांचा आदेश म्हणजे दिवसा विधानसभेमध्ये यशोमती ठाकूर यांना निवडून आणणे, आणि युवा सेनेच्या वतीने आम्ही ताकतीने यशस्वी ठाकूर यांच्यासोबत राहू, असे प्रतिपादन समीर लेनगुडे यांनी केले, यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अध्यक्ष भाषणात बोलत असताना समीर लेनगुडें सारखे युवक हा विकास आघाडी सोबत भक्कमपणे असणं ही आज राज्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले,या मेळाव्यामध्ये प्रमुख्याने उपस्थित माजी मंत्री तिवसा विधानसभेचे आमदार यशोमती ताई ठाकूर अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ वानखेडे, युवा सेनेचे विभागीय सचिव सागर दादा देशमुख सागर दादा देशमुख, युवक काँग्रेस, युवक राष्ट्रवादी व युवा सेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.