वाहतूक पोलिसांसाठी CCTV कॅमेरे ठरले शोभेची वस्तू….
धूम स्टाईल गाडी कॅमेऱ्यात कैद….रस्त्यांवर उतरून कारवाईचा दिखावा कश्यासाठी.
शिकवणी वर्गाला जाणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना पाच, पाच हजार दंडाच्या पावत्या …. निवेदन देता कारवाई कराच लागत- वाहतूक पोलीस..
राजु तुरणकर – संपादक.
वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा कारवाई करण्यातच पोलिसांना अधिक रस आहे. वरोरा टी पॉइंट, नांदेपेरा रोड, मंदर रोड, पळसोनी फाटा या ठिकाणी वाहतूक पोलिस हमखास सापडतात. दुचाकी वाहनचालक है तर वाहतूक पोलिसांचे मुख्य टार्गेट असून ऑटो रिक्षा ला माञ मासिक पास ची व्यवस्था करून वाहतूक अनियंत्रित करण्याची खुली सुट दिली आहे. अशी व्यवस्था वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी निर्माण केली आहे.
धूम स्टाईल दुचाकी स्वरांचा उच्छाद बंद करण्यासाठी रामनवमी समितीने दिलेला अल्टीमेटम लक्षात घेता वाहतूक नियंत्रक अधिकारी हे दुचाकी धारकांना म्हणजे अलगत शिकवणी वर्गाला जाणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना पाच पाच हजार रुपये रुपयांचे दंड आकारण्यात मस्त असून कारवाईचा करून आपली पाठ थोपटून घेण्यातच व्यस्त आहे.शहरामध्ये संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. वाहतूक पोलिस वाहतूक नियंत्रण व सुरक्षेचे उपाय करताना दिसून येत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मात्र धूम स्टाईल गाडी चालवणारे मुले हे जागोजागी लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असल्याने त्यांना बसल्या जागीच शोधता येईल असे असून सुद्धा वाहतूक पोलीस मात्र ती धूम स्टाईल वाहने चालवून लोकांचे जीव घेणाऱ्यांना सोडून विद्यार्थ्यांवर वसुलीचा बडगा काढताना वाहतूक प्रशासन दिसून येत आहे.
वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी कॉलेज समोर उभे राहून कारवाई करु नये :- अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हाप्रमुख.
राम नवमी समितीने निवेदन देत वाहातुक पोलिसांना सात दिवसांचा अल्टिमेटम देत शहरांतील अनियंत्रित वाहतूक सुधारण्याची मागणी केली, परंतु वाहतूक पोलीस माञ या धूम स्टाईल वाल्यांना सोडून विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारून वर्दीची दहशत पसरवीत आहे. तसेच वाहतूक पोलीस विभागाने कॉलेज परिसरात गाडी परवाना कॅम्प, ( ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प) लावून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे व कॉलेज समोर उभे राहून कारवाई करू नये – अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख.
हीच ती 5000 ची पावती….
शाळकरी विध्यार्थी व व सामान्य नागरिक वाहतूक शाखेचे टार्गेट: उमेश पोद्दार सामजिक कार्यकर्ते.
शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्याना पाच हजार दंड थोटावत असेल तर त्यांनी शिक्षण सोडावे काय ? की आई वडिलांनी काम धंदे सोडून मुलांनाच ने आन करावी. निवेदन हे विचित्र पध्दतीने वाहन चालवणाऱ्या व्यवस्थे विरोधात आहे, चीडीमार करीत,मद्यधुंद अवस्थेत असलेल्या, धूम स्टाईल वाल्यांना सोडून, ऑटो रिक्षा वाल्यांना खुली सूट माञ केवळ शाळकरी व ट्युशन करणारे विद्यार्थिनीला 5000 चा दंड विठ्ठलवाडी परिसरात जावून आकारण्यात आला, म्हणजे केवळ चांगल्या लोकांना टार्गेट करण्याचे कामं वाहतुक करीत आहे काय ? असा प्रश्न उमेश पोद्दार सामजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे.