वीज अंगावर पडल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू.

0
506

निसर्गाच्या प्रकोप, काळाचा घाला…

वीज अंगावर पडून शेतकरी महिलेचा मृत्यू.

आनंद नक्षणे : मारेगाव तालुक्यात आज दुपारी साडेतीन वाजे दरम्यान जोरदार वादळ व विजेच्या कडाक्यासह  मोठ्या प्रमाणात पाऊस आला. यादरम्यान पाऊस आल्याने गोरज येथील शेतकरी महिला घराकडे येताना वाटेतच वीज तिच्या अंगावर कोसळल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला.  निर्मला किसन आत्राम (37) रा. गोरज असे मृतक महिलेचा नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार शेतात काम करीत असताना अचानक विजेच्या कडाक्यासह पाऊस सुरू झाल्याने निर्मला घरी जाण्यासाठी निघाली. गावापासून काही अंतरावर पोहचली असता अचानक तिच्या अंगावर विज कोसळली. या घटनेत निर्मला हीचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेच्या पश्चात पती आणि दोन मुले असा  परिवार पाठीमागे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here