खळबळजनक, मारेगाव तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

0
212

अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याची आत्महत्या….

मारेगाव तालुक्यातील शेतकरी कवटाळतो मृत्यूला, चिंतनाचा विषय….

आनंद नक्षणे मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा येथील शेतक:याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दि.५ऑक्टोंबर रोजी दुपारी तिनच्या सुमारास उघड झाली. आशिष दिंगबर आस्वले (३४), असे मृत शेतक:याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार पांढरकवडा येथील शेतकरी आशिष आस्वले यांनी घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार करण्यापूर्वी आशिष चा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्याच्या नावे अडीच एकर शेती असून त्यांचेवर सोसायटी व एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी एक भाऊ असा आप्त परिवार पाठीमागे आहे.

मारेगाव तालुक्यातील सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय असून याकडे प्रशासकीय व राजकीय दृष्टिकोनातून कोणीही गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकरी मृत्यूला का कवटाळतोय हा प्रश्न आता जटील होत चालला असून, ही सामाजिक समस्या निर्माण झाली असून याकडे गांभीर्याने बघून चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here